पिंपरी चिंचवड : रिंगरोडचा वाद चिघडळला, पालखी काढत हजारो नागरिकांचे अनोखे आंदोलन

पिंपरी चिंचवड : रिंगरोडचा वाद चिघडळला, पालखी काढत हजारो नागरिकांचे अनोखे आंदोलन

पिंपरी चिंचवड –  पिंपरी चिंचवड मधील होणारा रिंगरोडचा वाद आज जोरदार पेटला. रिंगरोड मध्ये हजारो लोकांची घर जाणार असून रिंगरोडला विरोध करण्यासाठी आज हजारो नागरिकांनी पालखी काढत अनोखे आंदोलन केले. रिंग रोड जर झाला तर हजारो कुटुंब रस्त्यावर येतील . त्यामुळे हा रिंगरोड होऊ नये अशी मागणी नागरिक करत आहेत.
जी अधिकृत घर रिंगरोड मध्ये जाणार आहे त्यांचेच फक्त पुनर्वसन केले जाणार आहे. त्यामुळे आज प्राधिकरण कार्यालयावर हजारो नागरीक एकत्र येऊन मोर्चा काढण्यात आला. यामधे असंख्य महिलांनी सहभाग नोंदवला.
रिंग रोड मध्ये घर जाणाऱ्या नागरिकांचे अनोखे आंदोलन केले. पालखी सोहळा सुरु असल्याचा धागा धरत, टाळ मृदूंग घेऊन प्राधिकरण कार्यालयावर काढला मोर्चा. भजन-कीर्तन करून घरं न पाडण्यासाठी नागरिकांनी विठुरायाच्या साकडे घातले.

 

COMMENTS