पुण्यातील 15 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

पुण्यातील 15 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

पुणे :जिल्ह्यात 27 मे रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांवर 15 गावांनी बहिष्कार टाकला आहे . जिल्ह्यातील एकूण 22 गावांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यातील 19 गावं पुणे शहरालगतची आहेत. शहरालगत असलेल्या या गावांनी महापालिकेत समाविष्ट करून घेण्यासाठी हा पवित्रा हाती घेतला आहे.

ही गावं महापालिकेत सामावून घेण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्यानं त्याठिकाणी निवडणुका घेऊ नयेत, अशी या गावांची मागणी होती. मात्र एकदा जाहीर झालेली निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात येत नसल्यानं या गावांनी बहीष्काराचं हत्यार उपसले आहे. त्यात यश आल्यामुळे १५ गावांतील निवडणुका आपोआप रद्द होणार आहेत.

या गावांनी उगारलेलं बहिष्कारास्त्र कामी आल्यामुळे राज्य सरकारवर ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतचा दबाव वाढणार आहे.

 

COMMENTS