मध्यावधी निवडणुका आताच घ्या – उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

मध्यावधी निवडणुका आताच घ्या – उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

मुंबई – मध्यावधी निवडणुकीला शिवसेना घाबरत नाही, उद्या कशाला आताच मध्यावधी निवडणुका घ्या असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे. आज मुंबईत शिवसेनेच्या राज्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी यांच्या प्रशिक्षण शिबीरात उद्धव ठाकरे बोलत होते.

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकावर चौफेर टीका केली. गाईला वाचवण्यापेक्षा शेतक-याला वाचवा आणि पक्ष मजबूत करण्यापेक्षा देश मुजबूत करा अशा शब्दात त्यांनी टोलेबाजी केली. नोटबंदीचं मोठं गोडवं गायलं जात होतं. भ्रष्टाचार थांबणार, दहशतवाद थांबणार, सध्या देशात काय सुरू आहे. भ्रष्टाचार आहे तसाच सुरू आहे. काश्मिर तिकडे पटले आहे, पाकिस्तानी सैनिकांच्या हल्ल्यात आपल्या देशाचे जवान रोज शहीद होत आहेत. असं सांगत केंद्र सरकार आणि मोदींवर टीका केली.

COMMENTS