मीरा भाईंदरमध्ये चोरटे आणि भुरटे यांचा पराभव, भाजपचे शिवसेनेला उत्तर !

मीरा भाईंदरमध्ये चोरटे आणि भुरटे यांचा पराभव, भाजपचे शिवसेनेला उत्तर !

मुंबई – मीरा भाईंदरमध्ये मनी आणि मुनी यांचा विजय झाला आहे अशी टीका शिवसेनेनं भाजपवर केली होती. तसंच जैन मुनी नाही तर गुंड आहे आणि झाकीर नाईकसारखा दहशतवादी आहे या शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. त्याला आशिष शेलार यांनी त्याच भाषेत उत्तर दिलं आहे.

मनी आणि मुनीचा प्रश्न नाही तर मीरा भाईंदरमध्ये चोरटे आणि भुरटे यांचा पराभव झाला आहे असा पलटवार आशिष शेलार यांनी केला आहे. संजय राउत ह्याची मनस्थिति समजू शकतो. ज्या वेळेस पराभव होतो, आणि जनता नकारते तेंव्हा बावचळलेल्या.मनस्थिती असते अशा शब्दात आशिष शेलार यांनी राऊत यांना उत्तर दिले आहे. भाजप सर्वांना बरोबर घेऊन चालते, कुणाचंही लांगुलचान करत नाही असंही शेलार म्हणाले.

COMMENTS