मुंबईत 813 शेतकरी आले कुठून ?

मुंबईत 813 शेतकरी आले कुठून ?

राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज योगनेअंतर्गत शेतकऱ्याचे कर्जमाफ करण्यात आले आहे. मुंबई 694 आणि मुंबई उपनगरे 119 असे एकून  813 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याचं वाचून-ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. मुंबईत एवढे शेतकरी आले कुठून?, ते पूर्णवेळ शेतकरी आहेत की त्यांचे अन्यही व्यवसाय आहेत? त्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे का?, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

मुंबईत शेतकरी आहेत का, असा प्रश्न मलाही पडला होता. मी तसं अधिकार्‍यांना विचारलंही. मात्र चौकशी करुनच कर्जमाफी दिली जाणार असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

विशेष म्हणजे मुंबई उपनगरापेक्षा मुंबईतील शेतकरी जास्त असल्याने या यादीवर सोशल मीडियावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मुंबईत शेतीसाठी फारशी जागा उपलब्ध नाही. मग नेमके लाभार्थी कोण असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केले आहेत. तर मुंबई आणि मुंबई उपनगरातील लाभार्थी शेतकऱ्यांची यादीच आता प्रसिद्ध करावी अशी मागणीही जोर धरु लागली आहे.

 

 

 

COMMENTS