मुंबई विमानतळाबाहेरील टोलनाका शिवसेनेनं बंद पाडला

मुंबई विमानतळाबाहेरील टोलनाका शिवसेनेनं बंद पाडला

मुंबई – विमानतळाबाहेर प्रवाशांकडे वाहन पार्कींगसाठी आकारल्या जाणाऱ्या टोल विरोधात शिवसेनेनं आज जोरदार आंदोलन केलं. तसंच या टोलनाका बंद पाडला.

आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाले होते. आजच्या आंदोलनाच्या आधी शिवसेनेनं जीव्हीके कंपनीच्या व्यवस्थापनाला या टोलवसुलीविषयी विचारणा केली होती. मात्र व्यवस्थापनाकडून कोणतही समाधानकारक उत्तर मिळालं नाही. त्यामुळं आजचं आंदोलन करावं लागंल असं शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब यांनी सांगितलं. तसच यापुढे ही टोलवसुली बंद झाली नाही तर विमानतळ बंद पाडू असा इशाराही शिवसेनेनं दिलाय. गेल्या काही वर्षांपासून प्रवाशांकडून टोल वसूल केला जातो. तो आता 130 रुपयांपर्यंत पोचलाय. त्यातून महिन्याला सुमारे 35 ते 40 लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचा अंदाज व्यक्त होतोय. ही टोलवसुली अनधिकृत असल्याचा सार्वत्रिक आरोप आहे. तसेच नाग्रीकांमध्येही या टोलवसुलीबाबत प्रचंड रोष आणि मनस्ताप आहे. तसेच विमानतळ नूतनीकरण करताना हटवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा मूळ जागी बसविण्यात यावा अशी मागणीही शिवसनेने केलीय.

COMMENTS