राजू शेट्टींच्या किसान मुक्ती यात्रेला आजपासून सुरूवात

राजू शेट्टींच्या किसान मुक्ती यात्रेला आजपासून सुरूवात

मध्य प्रदेशातील मंदसौरपासून खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली देश पातळीवरील शेतकर अंदोलनाला आजपासून  सुरूवात होत आहे.  ही यात्रा संसदेच्या पावसाळी अधिवशेनाच्या सुरूवातीलाच दिल्लीत पोहचणार आहे. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांमधून ही यात्रा प्रवास करेल. दिल्लीत पोहोचल्यानंतर 18 जुलै रोजी जंतरमंतरवर देशभरातील एकत्र यावे असे आवाहन खासदार राजू शेट्टींनी केले आहे.

किसान मुक्ती  यात्रेत देशभरातील 130 हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होतील. 18 जुलैला ही यात्रा दिल्लीत पोहचणार आहे. शेतकऱयांचा साताबारा कोरा करावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, अशा मागण्या या यात्रेत असतील, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी  पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली होती.

COMMENTS