विरोधी पक्षांच्या 19 पैकी 9 आमदारांचे निलंबन मागे

विरोधी पक्षांच्या 19 पैकी 9 आमदारांचे निलंबन मागे

शेतकऱयांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरुन विधानसभेत गोंधळ घालणाऱया 19 आमदारांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यावर आज निर्णय घेत 19 पैकी 9 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आले.

संग्राम थोपटे (कॉंग्रेस) , नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी) ,दीपक चव्हाण (राष्ट्रवादी),दत्तात्रेय भरणे (राष्ट्रवादी) , अब्दुल सत्तर (कॉंग्रेस) , अवधूत तटकरे (राष्ट्रवादी), अमित झनक (कॉंग्रेस) , वैभव पिचड (राष्ट्रवादी), डी.पी. सावंत (कॉंग्रेस) अशी निलंबन मागे घेण्यात आलेल्या आमदारांची नावे आहेत.

विरोधी पक्षांच्या 19 आमदारांचे निलंबन आज मागे घेतले जाण्याची शक्‍यता होती. मात्र, 9 आमदारांचे निलंबन मागे घेतले असून 10 आमदारांचे निलंबन तसेच कायम ठेवण्यात आले आहे. दरम्यान, या 10 आमदारांचे निलंबन अधिवेशन संपण्याआधीच मागे घेण्याची शक्‍यता आहे.
आमदारांचे निलंबन मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले होते. विरोधकांना बाहेर ठेवून विधीमंडळाचे कामकाज चालवण्यात सरकारला रस नाही. त्यामुळे सभापतींशी चर्चा करुन निलंबन मागे घेण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यानंतर आज 9 आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले.

18 मार्चला अर्थसंकल्प मांडताना अडथळा आणणे, तसेच सभागृहाचा अवमान करणे, या कारणांवरुन 31 डिसेंबरपर्यंत 19 आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. आज 9 आमदारांचे निलंबन मागे घेतले असून 10 आमदारांचे निलंबन तसेच कायम ठेवण्यात आले आहे.

COMMENTS