“विलासराव देशमुख हयात असते तर काँग्रेसची ही हालत झालीच नसती”

“विलासराव देशमुख हयात असते तर काँग्रेसची ही हालत झालीच नसती”

पुणे – काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त पुण्यात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनीही उपस्थिती लावली. यावेळी बोलतना त्यांनी विलासराव देशमुखांबद्दल गौरवउद्गार काढले. विलासराव देशमुख हयात असते तर राज्यात भाजप शिवसेनेचे सरकारच आले नसते असे सबनिस म्हणाले. काँग्रेसची एवढी वाताहत झाली नसती असंही ते म्हणाले. त्यांच्या नेतृत्वामध्ये एवढी मोठी ताकद होती  की ते एकहाती राजकारणाला वेगळ वळण देऊ शकत होते असंही सबनिस म्हणाले.  या कार्यक्रमाला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन देशमुख,  बाळासाहेब शिवरकर आदी नेते उपस्थित होते.

COMMENTS