शेतक-यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून गोळीबार !

शेतक-यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून गोळीबार !

नाशिक – विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी पुकारलेला संप आजही सुरूच आहे. काल रात्री या संपाला नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात दळवट गावात हिंसक वळण लागलं. गुजरातला भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक 200 ते 300 शेतक-यांनी आडवला. आणि त्याच्यातील  भाजीपाला आणि फळे रस्त्यावर टाकायला सुरूवात केली. त्यावेळी तिथे असलेल्या पोलिकांनी शेतक-यांना माल रस्त्यावर फेकण्यास मज्जाव केला. त्यामुळे शेतकरी संतापले. पोलीस आणि शेतक-यांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे पोलिसांनी शेतक-यांवर लाठीमार केला. त्यामुळे अधिक संतापलेल्या शेतक-यांनीही पोलिसांच्या गाडीवर दगडफेक सुरू केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून मग पोलिसांनी हवेत गोळीबार केला. त्यानंतर परिसरात तणावाची परिस्थिती असून मोठी पोलीस कुमक त्या ठिकाणी बोलवण्यात आली आहे.

COMMENTS