श्वेत दहशतवाद मराठी माणसाच्या मुळावर उठलाय. मनसेचा हल्लाबोल

श्वेत दहशतवाद मराठी माणसाच्या मुळावर उठलाय. मनसेचा हल्लाबोल

मुंबई – मीरा भाईंदर निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि जैन धर्मगुरूमधील वादात आता मनसेनं उडी घेतली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी जैन मुनींना दहशतवादी म्हटलं होतं. आता मनसेनंही तसाच हल्लाबोल जैन धर्मगुरुंवर केला आहे. कमळाच्या आश्रयाने वाढत चाललेला श्वेत दहशतवाद मराठी माणसाच्या मुळावर उठला आहे, तो वेळीच ठेचायला हवा असं ट्विट मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केलं आहे. शिवसेनेनं यापूर्वीच निवडणुकीत धार्मिक प्रचार केल्याबद्दल निवडणूक रद्द करण्याची मागणी केली होती. आता या नव्या ट्विटमुळे पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.

COMMENTS