ही कर्जमाफी आहे की, कर्ज वसुली आहे – अजित पवार

ही कर्जमाफी आहे की, कर्ज वसुली आहे – अजित पवार

अहमदनगर – ही कर्जमाफी की कर्ज वसुली आहे हेच समजायला मार्ग नाही. जिल्हा बैंकेत पैसा पडून..मार्ग काढू म्हणतात, 8-9 महिने झाले, एवढ्या काळात मुलगा जन्माला येतो, पण सरकारला अजून मार्ग काढता आला नाही.  अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

कोपर्डी घटनेला एक वर्ष पूर्ण झाली आहे तरी, कोपर्डी निर्भयाला अजून न्याय नाही, सरकारने लवकर न्याय देऊ, हे आश्वासन सुद्धा पाळलं नाही. गर्वहरण करण्याची ताकत पुनताब्यांच्या शेतकऱ्यांत आणि नगर जिल्ह्यात आहे, कर्जमाफीचा हा सुरू झालेला लढा पुढेही न्यावा लागणार आहे असे अजित पवार म्हणाले.

COMMENTS