2019 लोकसभा निवडणुकीत 350 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य – अमित शहा

2019 लोकसभा निवडणुकीत 350 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य – अमित शहा

नवी दिल्ली – आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या   संदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (गुरूवारी) ज्येष्ठ मंत्र्यांची बैठक बोलावली होती. देशातील 150 जागांवर भाजपचा पराभव झाला होता. तिथे विजयासाठी आतापासूनच प्रयत्न केले पाहिजेत, असे शहा यांनी बैठकीत सांगितले. शहा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत 350 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.  

या बैठकीत एकूण 31 नेत्यांनी सहभाग नोंदवला होता. या जागा निवडून त्यावर पुढील दोन वर्षे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या योजनांविषयी मंत्र्यांकडून माहिती मागवली. भाजप मुख्यालयात झालेल्या बैठकीत अनेक मंत्री सहभागी झाले होते.

या वेळी बैठकीत अनंत कुमार, रवीशंकर प्रसाद, नरेंद्रसिह तोमर, जे.पी.नड्डा, पीयूष गोयल, धर्मेंद प्रधान, निर्मला सीतारमण, मनोज सिन्हा, प्रकाश जावडेकर आणि अर्जुन मेघवाल आदी नेते सहभागी झाले होते. अमित शहा यांनी सर्व मंत्री आणि नेत्यांकडून मतदारसंघांविषयी माहिती जाणून घेतली. विविध राज्यातील काही नेत्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. पक्षाकडून मंत्र्यांना अनेक जबाबदार दिल्या होत्या. यामध्ये दलितांच्या घरी जेवणाचाही समावेश होता. या सर्व कार्यक्रमांबाबत माहिती घेण्यात आली.

 

COMMENTS