“गाजरही म्हणतंय मला बाहेर काढू नका !”

“गाजरही म्हणतंय मला बाहेर काढू नका !”

औरंगाबाद – औरंगाबादमद्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेच्या समारोपात शरद पवारांसह सर्वच नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. कर्जमाफी, अर्थसंकल्पासह सर्वच मुद्द्यांवरुन सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. कर्जमाफी केली आणि लोकांनाच पैसे भरायला लावले ही कसली कर्जमाफी, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  केला आहे. यावेळी वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या मुद्यावरुनही सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न पवारांनी केला आहे.

दरम्यान धार्मिक दंगली, नोटाबंदीवरुनही सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. गाजरही म्हणतंय मला बाहेर नका काढू अशा शब्दांत त्यांनी शिवसेना-भाजपवर तोंडसुख घेतलं. तर सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

COMMENTS