महावितरणच्या लाचखोर कर्मचा-यांना अटक, शेतक-यांकडून घेतली एक लाखाची लाच !

महावितरणच्या लाचखोर कर्मचा-यांना अटक, शेतक-यांकडून घेतली एक लाखाची लाच !

उस्मानाबाद –  जिल्ह्यातील महावितरणच्या लाचखोर कर्मचा-यांना अटक करण्यात आली आहे. शेतातील विजेचा डीपी दुरुस्त करून  बसविण्यासाठी शेतकऱ्यांकडून १ लाख रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलं आहे.यामध्ये सहायक अभियंत्यासह २ जणांचा समावेश असून लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. सहाय्यक अभियंता सुधीर बुरनापल्ले, वरिष्ठ तंत्रज्ञ सरदार खान पठाण व खासगी इलेक्ट्रिकल गुत्तेदार पांडुरंग सिद्धराम जाधव या तिघांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान तुळजापूर तालुक्यातील होर्टी गावातील  द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याकडून दीड लाखांची लाच त्यांनी मागितली होती. शेतातील बोअर वेल विजेचा डीपी नादुरुस्त असल्याने गेल्या ६ महिन्यापासून बंद होते. हा डीपी दूरुस्त करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती

COMMENTS