पैशाने बालके परत येणार नाहीत- भाई जगताप

मुंबई – भंडाऱ्यामध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. यामध्ये लहान बालकांचा मृत्यू झाला आहे. आमच्या सरकारने लगेच मदत दिली ही चांगली बाब आहे. पण पैशाने बालके परत येणार नाही. किंवा त्या कुटुंबातील लोकांचा दुख कमी होणार नाही, अशा शब्दात मुंबई काॅंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.

भंडारा जिल्हा शुक्रवारी झालेल्या शाॅकसर्किटमुळे १० बालकांचा मृत्यू झाला. शासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सरकारच्या वतीने पिडित कुटुंबांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. त्यावर भाजपने दहा लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली.

भाजपच्या मागणीला समर्थन देत असताना काॅंग्रेसचे नेते भाई जगताप यांनी आणखी मदत दिली पाहिजे, अशी मागणी केली. तसेच पैश्याने ही बालक परत मिळणार नाही पण त्या आई-वडिलांना एक आधार मिळेल. सर्व सरकारी रुग्णालयाचं ऑडिट झालं पाहिजे. आम्ही सुद्धा सभागृहात म्हणत असतो ऑडिट झालं पाहिजे. सरकार कोणाचं असो अशा घटना थांबल्या पाहिजे असं भाई जगतापांनी म्हटले आहे.

COMMENTS