निवडणुकांना सुरुवात झाल्यानंतरही काँग्रेसमधील आऊटगोईंग सुरुच, ‘या’ नेत्या शिवसेनेच्या वाटेवर ?

निवडणुकांना सुरुवात झाल्यानंतरही काँग्रेसमधील आऊटगोईंग सुरुच, ‘या’ नेत्या शिवसेनेच्या वाटेवर ?

मुंबई – लोकसभा निवडणुकांना सुरुवात झाली असुन कालच दुसय्रा टप्प्यातील मतदान पार पडलं. परंतु राजकीय नेत्यांची नाराजी मात्र सुरुच असल्याचं दिसत आहे. या नाराजीमुळे अनेक नेते आपला पक्ष बदलत आहेत. अशातच काँग्रेसला आणखी एक धक्का बसला असून काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदीही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांनी नुकतीच काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. आपल्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अभय दिल्यामुळे चतुर्वेदींनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर त्या आता शिवसेनेत जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान प्रियांका चतुर्वेदी हा काँग्रेसचा राष्ट्रीय चेहरा असल्यामुळे पक्षाला मोठा हादरा बसणार असल्याचं बोललं जात आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी डीएनए, तेहलका, फर्स्टपोस्ट यासारख्या वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केलं आहे. त्यांची मे 2013 मध्ये काँग्रेस प्रवक्त्या म्हणून निवड झाली होती. सोशल मीडिया, वृत्तवाहिन्यांवर काँग्रेस पक्षाची बाजू  त्या मांडत होत्या. परंतु आता त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.

COMMENTS