देशभरातील कोट्यवधी शेतक-यांचा एल्गार, दिल्लीत जलभरो आंदोलन करणार !

देशभरातील कोट्यवधी शेतक-यांचा एल्गार, दिल्लीत जलभरो आंदोलन करणार !

नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वीच नाशिक ते मुंबई असा चालत प्रवास करुन सरकारविरोधात आंदोलन करणा-या किसान सभेनं आता आपला मोर्चा दिल्लीच्या दिशेनं वळवला आहे. 9 ऑगस्टला देशभरातले कोट्यवधी शेतकरी दिल्लीमध्ये जलभरो आंदोलन करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील अखिल भारतीय किसान महासभेच्या कार्यालयात पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी डॉ. अशोक ढवळे, अजित नवले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईचं आंदोलन हे एक टप्पा होतं, त्यानंतर अजूनही बरीच ध्येयं गाठायची आहेत, असं म्हणत त्यांनी आपल्या नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे..

दरम्यान या आंदोलनासाठी देशभरातल्या शेतकऱ्यांच्या घराघरात जाऊन 10 कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचं निवेदन पंतप्रधानांना पाठवलं जाणार आहे. संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची संपूर्ण अंमलबजावणी या तीनम मुख्य मुद्द्यांवर हे आंदोलन होणार आहे. या सह्यांचं निवेदन पाठवल्यानंतर 9 ऑगस्टला एकाच दिवशी देशभरातले कोट्यवधी शेतकरी हे आंदोलन करणार आहेत.

COMMENTS