राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय !

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय !

मुंबई राज्यमंत्रिमंडलाच्या बैठकीत आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली आज ही बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून विशेष म्हणजे काल राजीनामा देणारे आरोग्यमंत्री दिपक सावंत हे देखील या बैठकीला उपस्थित होते. त्यामुले या बैठकीदरम्यान त्यांच्या उपस्थितीबाबतही चर्चा रंगली होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दीपक सावंत यांना बैठकीसाठी उपस्थित राहण्यास सांगितल्यामुळेच ते या बैठकीला उपस्थित होते अशी माहिती आहे.

 

आजच्या बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय

 

  • एकात्मिक बाल विकासासाठी राज्यात 2018-19 पासून राष्ट्रीय पोषण मिशनची अंमलबजावणी करण्यास मान्यता. त्यासाठी येणाऱ्या राज्य हिश्श्यास मंजुरी देण्यात आली आहे.

 

  • चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात खाजगी भागिदारी तत्त्वावर 100 खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

 

  • मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथील विधी विद्यापीठांना प्रशासकीय व शैक्षणिक खर्चासाठी पुढील 5 वर्षांकरीता प्रत्येकी 5 कोटी रुपयांचा ठोक निधी देण्यात येणार आहे.

 

  • नागरी सुविधा देण्यासाठी राज्यातील कटक मंडळांना राज्य योजनेमधून निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

  • शासनाच्या महत्त्वाच्या प्रकल्पांना सुलभ आणि नियमित गौण खनिजांच्या पुरवठ्यासाठी महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम-2013 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

 

  • अंब्रेला एकात्मिक बाल विकास सेवा योजनांमधील उपयोजनांना नवीन नावे देण्यासह योजनांमधील बाबींचे सुधारित दर लागू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

 

COMMENTS