नारायण राणेंचं चाललंय तरी काय?, एकीकडे म्हणतात आपण एनडीएबरोबर राहणार, तर दुसरीकडे भाजपावर जाहीर टीका !

नारायण राणेंचं चाललंय तरी काय?, एकीकडे म्हणतात आपण एनडीएबरोबर राहणार, तर दुसरीकडे भाजपावर जाहीर टीका !

मुंबई – भाजप खासदार नारायण राणेंचं सध्या चाललंय तरी काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. कारण एकीकडे म्हणतात आपण एनडीएबरोबर राहणार, तर दुसरीकडे भाजपावर जाहीर टीका करत आहेत. आज नारायण राणे यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. लोकांना विचार 15 लाख मिळाले का? वर्षाला 2 लाख नोकऱ्या मिळाल्या का?, आज पाच वर्षात ही अवस्था झाली ह्यांचे खासदार, आमदार पालकमंत्री तोंड उघडतात का? असा सवाल राणे यांनी केला आहे.

दरम्यान नारायण राणे यांनी बूथ कार्यकर्त्याना कळकळीची विंनती केली आहे. धोका करू नका ,जे हवं ते मागा पण सूर्याजी पिसाळ होऊ नका असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे राणे यांचं यांचं चाललंय तरी काय असा सवाल आता राजकीय वर्तुळात केला जात आहे.

COMMENTS