चाय पे चर्चानंतर आता मोदींची परीक्षा पे चर्चा !

चाय पे चर्चानंतर आता मोदींची परीक्षा पे चर्चा !

नवी दिल्ली – मन की बात, चाय पे चर्चा या कार्यक्रमानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम घेण्याच ठरवलं आहे. या कार्यक्रमाची सुरुवात 16 फेब्रुवारीपासून होणार असून तालकटोरा मैदानावर सकाळी 11 वाजता ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या कार्यक्रमाचं सादरीकरण देशातील सर्व शाळा आणि कॉलेजेसमध्ये करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांमध्ये असलेली परीक्षांबाबत भीती आणि तणावाबाबत चर्चा करणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाचं नाव परीक्षा पे चर्चा असं ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान पंतप्रधान मोदी यावर्षीच्या बोर्ड परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे परीक्षेच्या तोंडावर त्यांनी हा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं असून तालकटोरा मैदानावर त्यांचा हा पहिला कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मोदी देणार आहे. तसेच हा कार्यक्रम देशभरातील शाळा आणि कॉलेजमध्ये दाखवण्यात येणार असल्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांचा आगामी परीक्षेचा ताणतणाव कमी केला जाण्याचा हा प्रयत्न आहे.

COMMENTS