अभिनेता प्रकाश राजचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र!

अभिनेता प्रकाश राजचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र!

नवी दिल्ली – गुजरातमध्ये भाजपला मिळालेल्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सगळीकडून कौतुक केलं जात आहे. राजकीय वर्तुळातून त्यांचं अभिनंदन केलं जात असताना अभिनेता प्रकाश राजनं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कान टोचले असल्याचं दिसत आहे. प्रकाश राज यांनी मोदींना खुलं पत्र लिहून तुम्ही खरच जिंकले आहात का? असा प्रश्न विचारला आहे.

एवढच नाही तर तुमच्या विकास मॉडेलचं काय झालं ? तुमचा पक्ष 150+ जागा जिंकणार होता, त्याचं काय झालं ? असा प्रश्नही प्रकाश राजनं मोदींना विचारला आहे. लोकांना विभागण्याचं राजकारण काम करत नाही. आपल्या देशात पाकिस्तान, धर्म आणि जातीपेक्षाही मोठे मुद्दे आहेत. आपल्या देशात शेतक-यांचे काही मुलभूत प्रश्न आहेत ज्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे तुम्ही कुठे आहात? नेमकं कोणतं राजकारण खेळत आहात? असा प्रश्नही प्रकाश राजनं विचारला आहे.

COMMENTS