मराठा आंदोलनकर्त्यांनी शांततेला प्राधान्य द्यावं, शरद पवार यांनी काढले पत्रक !

मराठा आंदोलनकर्त्यांनी शांततेला प्राधान्य द्यावं, शरद पवार यांनी काढले पत्रक !

मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनकर्त्यांनी शांततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.याबाबत शरद पवार यांनी एक पत्रक काढलं असून राज्यकर्ते व हितसंबंध घटक मराठा आंदोलन बदनाम करण्याचे काम केलं जात असल्याचंही या पत्रकात पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज्यात मराठा आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली. औरंगाबादमध्येही आंदोलनाला हिंसक वळण आलं होतं. त्यामुळे यावरही शरद पवार यांनी भाष्य केलं असून औद्योगिक क्षेत्राला आंदोलनाची झळ पोहोचणार नाही याची काळजी घ्यायला हवी. तसेच हिंसा, जाळपोळ, दंगे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे प्रकार सक्तीने टाळायला हवेत असंही शरद पवार यांनी या पत्रकात म्हटलं आहे.

COMMENTS