भाजप सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ? – उद्धव ठाकरे

भाजप सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ? – उद्धव ठाकरे

मुंबई – विविध प्रश्नांवरुन आज उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदारी टीका केली आहे. या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. सरकारचे काम प्रश्न सोडवण्यासाठी आहे की प्रश्न निर्माण करण्याचे आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. गोरखपूर पोटनिवडणुकीत जे होतं ते इथं का होवू शकत नाही. जर सत्तेत येवूनही अपेक्षा पूर्ण होवू शकणार नसतील तर सत्ता काय कामाची. शेतकरी मोर्चाला पाठिंबा दिल्यावर अनेकांना आश्चर्य वाटले. भगवा-लाल कसं काय एकत्र आले ? असं विचारलं गेलं. मी लाल रंग पाहिला तो माता भगिनींच्या पायातून येणा-या लाल रक्ताचा असं स्पष्टीकरणही उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे..

दरम्यान अंगणवाडी सेविकांचा प्रश्नही गंभीर असून त्यांच्याविरोधात लावला जाणारा मेस्मा लावू देणार नसल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. तसेच कोळी बांधवांच्या समस्या सोडवण्याचे काम मी करणार असून त्यांच्याबाबत सरकारनं केवळ घोषणा केल्या असून त्या घोषणांची अंमलबजावणी कधी होणार? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

COMMENTS