मुख्यमंत्री फडणवीस खोटारडे, शिवसेनेच्या खासदाराचा आरोप !

मुख्यमंत्री फडणवीस खोटारडे, शिवसेनेच्या खासदाराचा आरोप !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटारडे असल्याची टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्यावर खोटे आरोप केले असून त्यांनी याबाबत पुरावे दाखवावेत असंही राऊत म्हणाले आहेत. याबाबत विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

दरम्यान कोकणात रिफायनरी आणण्यासाठी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आग्रह धरला होता असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. परंतु त्यांचं हे विधान साफ चुकीचं असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्री धादांत खोटे बोलत असून यासंदर्भात कधी?, केव्हा?, कुठे?  बैठक झाली याची माहिती मुख्यमंत्र्यांनी द्यावी. अशी मागणीही खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. मी संसदेत कधी अशी मागणी केली?, किंवा पंतप्रधानांकडे कधी मागणी केली? याची लेखी माहिती देण्याची मागणीही त्यांनी पत्रात केली आहे.

COMMENTS