अबब ! आता पाणीही महागलं, राज्य सरकारकडून भरमसाठ वाढ !

अबब ! आता पाणीही महागलं, राज्य सरकारकडून भरमसाठ वाढ !

मुंबई – राज्यातील पाण्याच्या दरात भरमसाठ वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सामान्यांच्या तोंडचं पाणी आता पळणार आहे.  मिनरल वॉटर, शीतपेये, बिअर उत्पादक उद्योगांसाठी पाण्याच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. पूर्वी एक हजार लीटरला १६ रुपये दर आकारला जायचा परंतु आता एवढ्याच पाण्यासाठी १२० रुपये द्यावे लागणार आहेत. २०१० नंतर पहिल्यादाच राज्यात पाण्याच्या दरात वाढ करण्यात आली असून शेतीसाठी आणि घरगुती वापरासाठी पाण्याचा दरात १७ टक्के वाढ होणार आहे. १ फेब्रुवारी २०१८ पासून ही दरवाढ लागू होणार आहे.

 

दरम्यान मीटर न बसवता पाणी घेणाऱ्या नगरपालिका, महापालिका आणि उद्योगांना दीडपट दर द्यावा लागणार आहे. तसेच जलसंपदा विभागाशी करार न करता पाणी उचलणाऱ्यांना दोन पट दर द्यावा लागणार आहे. पालिकांनी पिण्यासाठी पाणी घेऊन ते उद्योगांना पुरवल्यास तीन पट दर आकारण्यात येणार असून प्रवाही कालव्यावरील शेतकरी आणि उपसा योजनेवरील शेतकरी यांच्यातील पाणीपट्टी दरातील तफावत दूर करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. जास्त पाणी वापरणाऱ्यांना जास्त पाणीपट्टी आणि कमी पाणी वापरणाऱ्यांना कमी पाणीपट्टी असणार आहे.

नगरपालिकांमधील पाणी वापराचे नियोजन

अ वर्ग नगरपालिकांसाठी १२५ लिटर प्रती व्यक्ती

ब वर्ग नगरपालिका १०० लिटर  प्रती व्यक्ती

 क वर्ग नगरपालिका ७० लिटर प्रती व्यक्ती

 

COMMENTS