एकनाथ खडसेंनी अबू आझमींना खडसावले, मेल्यानंतर कफन इथलेच घेता ना, मग वंदे मातरम का म्हणत नाही ?

एकनाथ खडसेंनी अबू आझमींना खडसावले, मेल्यानंतर कफन इथलेच घेता ना, मग वंदे मातरम का म्हणत नाही ?

विधानसभेत आज (शुक्रवार) वंदे मातरम् गीत गाण्यावरून गदारोळ झाला. सत्ताधारी आमदार आणि विरोधी आमदार प्रचंड आक्रमक झाले. सत्ताधारी विरोधक आमने-सामने येत एकमेकाच्या समोर भिडतात की काय, अशी परिस्थीती निर्माण झाली होती. यावेळी भाजप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व समाजवादी पक्षनेते अबू आझमी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

खडसे म्हणाले, “स्वातंत्र्याचं संपूर्ण युद्ध वंदे मातरम गातच लढलं गेलं, तर तुम्हाला आक्षेप का? वंदे मातरम चुकीचं काय? ‘माँ तुझे सलाम’… जिथे आम्ही जन्मला, इथलं अन्न-पाणी घेता, मृत्यूनंतर जमीन, कफन इथलीच असेल. जिथे तुम्ही वाढला, लहानाचं मोठं झाला, मृत्यूनंतरही याच मातीत अत्यंसंस्कार होणार असतील, तर त्या मातीला नमन करण्यास अडचण काय?

भाजपचे आमदार अनिल गोटे म्हणाले, ” समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वंदे मातरम म्हणण्यास विरोध केला आहे. या देशात राहून वंदे मातरम् ला विरोध केला जातो. इस देश रहेंना होगा तो वंदे मातरम् कहना होगा.” त्यावर संतप्त झालेल्या आझमी यांनी बोलू देण्याची मागणी तालिका अध्यक्ष सुभाष साबणे यांच्याकडे केला. त्यावेळी सत्ताधारी आमदारांनी गोंधळ सुरू केला. त्यामुळे आझमी यांना बोलण्यास अडचण येत होती. त्यामुळे आझमी वेलमध्ये उतरले. त्यांच्या बाजूनी विरोधक आमदारही घोषणा देत होते.

यावेळी आझमी म्हणाले, ” या देशात मोहब्बत फक्त गीत गाऊन होणार नाही. मुस्लीम आहे म्हणून विरोध का करता ? सारे जहाँ से आच्छा हिंदूस्ता हमारा हे गीत कोणी लिहले ? शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते काय ? अफजल खानांच्या भेटीवेळी शिवाजी महाराजांचे वकिल कोण होते? इंग्रजांच्या विरोधात लढणारे टिपू सुलतान कोण होते? माझ्या म्हणण्याचा चुकिचा अर्थ काढला जात आहे. मी एकदा नाही हजारदा देशाचा विजय असो, म्हणायला तयार आहे.”

 

 

 

COMMENTS