नारायण राणेंनी काँग्रेसला विजयासाठी ‘हा’ दिला मंत्र !

नारायण राणेंनी काँग्रेसला विजयासाठी ‘हा’ दिला मंत्र !

मुंबई – माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या संसदीय कारकिर्दीचा सन्मान करण्यासाठी विधीमंडळामध्ये अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. दोन्ही सभागृहातील सदस्यांनी इंदिरा गांधींचे गुणगाण गायले. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांनीही इंदिरा गांधी यांच्या संसदीय कारकिर्दीचा आढावा घेतला. यावेळी बोलतना त्यांनी आणीबाणीमधला एक प्रसंग सांगितला. आणिबाणीनंतर इंदिरा गांधी निवडणूक हरल्या होत्या. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी पराभवाबद्दल विचारले असता त्यांनी “ हार गये तो क्या हुआ फिर जितके आयेंगे” असं उत्तर दिलं होतं.

इंदिरा गांधीच्या त्या उत्तराची आठवण करुन देत पराभवाने खचलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना विजयासाठी पुन्हा आत्मविश्वास येण्यासाठी ते वाक्य आठवा असं म्हणाले. आता  राणेंचा तो सल्ला काँग्रेसला किती लागू पडतो हे आगामी काळात दिसून येईलच.

COMMENTS