हा अर्थसंकल्प सर्वोत्तम आहे – मुख्यमंत्री

हा अर्थसंकल्प सर्वोत्तम आहे – मुख्यमंत्री

मुंबई – अर्थसंकल्पाची साईज आणि तुटीचे विश्लेषण बघितले राज्यात ही तूट 1. 9% टक्के आहे. त्यामुळे यावर्षीचा अर्थसंकल्प हा सर्वोत्तम असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच राज्याची अर्थव्यवस्था साऊंड ट्रॅकवर चालली असून जीडीपीच्या 16.8 % टक्के कर्ज आहे. ते तुलनेत चांगले असून देशामधील आपली स्थिती चांगली असल्याचंही मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवाजी स्मारकसाठी 300 कोटी रुपये तरतूद केली असून पुरवणी मागण्यात नंतर पुन्हा तरतूद करण्यात येईल असंही ते म्हणाले आहेत. तसेच डॉ आंबेडकर स्मारकासाठी 150 कोटींची तरतूद केली आहे. तसेच मागेल त्याला शेततळे ह्या योजनेत 62 हजार शेततळी पूर्ण झाली असून यासाठी 160 कोटी एवढा निधी उपलब्ध करुन दिला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच समुद्राची धूप थांबवण्यासाठी जागतिक बँकेची मदत घेतली जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS