सीबीएसई विद्यार्थ्यांच्या पालकांना राज ठाकरेंचं पत्र, “आपल्या मुलांना फेर-परीक्षेला बसवू नका !”

सीबीएसई विद्यार्थ्यांच्या पालकांना राज ठाकरेंचं पत्र, “आपल्या मुलांना फेर-परीक्षेला बसवू नका !”

मुंबई – सीबीएसई बोर्डातील इयत्ता दहावीतील गणित विषयाची आणि बारावीच्या अर्थशास्त्र या विषयाची फेर-परीक्षा घेण्यात येणार आहे. या फेर-परीक्षेला आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही विरोध केला आहे. तसेच सीबीएसईतील विद्यार्थ्यांच्या पालकांना राज ठाकरे यांनी पत्र लिहिलं असून आपल्या मुलांना सीबीएसईच्या फेर-परीक्षेला बसवू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे. राज ठाकरे यांनी पालकांना लिहिलेलं पत्र खालीलप्रमाणे..

सस्नेह जय महाराष्ट्र,

सीबीएसईच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका परीक्षे आधीच फुटल्या, हा मुळात सरकारचा हलगर्जीपणा, पण स्वतःची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावत आहेत? सरकारला जर प्रश्नपत्रिकांची गोपनीयता नीट राखता येत नसेल तर त्यात विद्यार्थ्यांचा काय दोष, त्यांनी का पुन्हा त्या विषयांच्या परीक्षेला बसायचं?

माझं देशभरातील पालकांना आवाहन आहे की कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांना फेर-परीक्षेला बसवू नका. तुम्ही झुकताय हे जर सरकारच्या लक्षात आलं तर ते तुम्हाला अजून वाकवायचा प्रयत्न करेल. तुम्ही निर्णयावर ठाम रहा, सरकारला काय निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ द्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना देशभरातील विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पाठीशी ठाम उभी आहे, उभी राहील.

आपला नम्र

राज ठाकरे

COMMENTS