अजित पवारांच्या राजीनाम्याची “ही’ आहेत कारणे?

अजित पवारांच्या राजीनाम्याची “ही’ आहेत कारणे?

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. कार्यकाळ संपण्यापूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.अजित पवार साताऱ्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे. उदयनराजेंविरोधात सक्षम उमेदवार मिळत नसल्याने राष्ट्रवादीने अजित पवारांनाच त्यांच्या विरोधात उतरण्याची खेळी चालवली असल्याचं कळतंय. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

दरम्यान विधानसभेसोबत लोकसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे राजीनामा देऊन अजित पवार सातारा लोकसभा मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रीत करतील, असं बोललं जातंय. अजित पवार साताऱ्यातून लोकसभा लढल्यास बारामतीची जागा रिकामी होईल, त्याजागी त्यांचे पूत्र पार्थ पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची राष्ट्रवादीची रणनीती असू शकते.
किंवा ईडीच्या कारवाईतून सहानुभूती मिळविण्यासाठीही त्यांनी राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS